जिगंर वाडी गटार व कचऱ्याच्या समस्या वरून नागरिक संतप्त

 


मुख्य संपादक:-सचिन गुंजाळ 



चाळीसगाव तालुक्यातील घाट रोडवरील जिगरवाडी परिसरात गटाराची सफाई आणि कचऱ्याचे संकलन नीट न झाल्याने नागरिकांमध्ये त्रिव नाराजी पसरली आहे गटारातील सांडपाणी रस्त्यावर साचत असून कचरा वेळेवर न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डास मच्छरांचा साम्राज्य वाढले आहे यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी खोकला अशा आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही प्रशासनाकडून केवळ विजय जाधव या कंत्राटदाराला भेटा आणि बोला असे उत्तर दिले जात आहे मात्र संबंधित कंत्राटदार विजय जाधव यांना फोन केल्यास ते कॉल उचलत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच संताप निर्माण झाला आहे आम्ही दरवेळी आश्वासनावर समाधान मानायचं का समस्या त्वरित न सोडवल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे

Comments

Popular posts from this blog

चाळीसगावात 60 कोटीचे ॲम्फेटामाइन पकडले

कै. रमेश विक्रम वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंधशाळा चाळीसगाव येथे विद्यार्थ्यांना अल्पोआहार

चाळीसगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार हेक्टरी मदत करावी म्हणून मराठा महासंघ व शेतकरी बचाव कृती समिती च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मागणी