Posts

जळगाव जिल्ह्यात ८ नवीन ग्रामपंचायतींना शासन मान्यता, विकासाला वेग

Image
 नवं दृष्टी न्यूज  जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल होत असून, राज्य शासनाने आठ नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची एकूण संख्या ११६० वरून वाढून ११६८ झाली आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमुळे आणि वाढलेल्या अधिकारांमुळे अनेक गावांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर शासनाने ग्रामपंचायत स्थापनेच्या अटींमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. पूर्वी किमान १००० लोकसंख्या आवश्यक होती, ती आता ७०० पर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच, गाव व तांड्यामधील ३ किमी अंतराची अटही हटवण्यात आली आहे, त्यामुळे लहान वस्त्या व तांड्यांना स्वतंत्र ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सुधारित निकषांनुसार जिल्ह्यातून एकूण ४२ प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी निकष पूर्ण करणाऱ्या ८ प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. नव्या ग्रामपंचायतींमध्ये चाळीसगाव तालुक्यातील ५, जामनेर तालुक्यातील २ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील १ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. बोरखेडा येथून बोरखेडासीम, गोद्री येथून सुकानाईक तांडा, देऊळगाव ग...

कजगाव येथे नगरसेवक सचिन गुंजाळ यांचा जंगी सत्कार

Image
  नवं दृष्टी न्यूज  अंबरनाथ येथील नगरसेवक सचिन गुंजाळ यांचा कजगांव येथे नागरिकांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. कजगाव येथे आगमन होताच स्थानिक नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. 📰 उपस्थित मान्यवर: मनुदास महाजन (जिल्हाध्यक्ष, अखिल ग्रामीण पत्रकार संघ), दिनेश पाटील, अनिल महाजन, संजय महाजन, अमिन पिंजारी, संजय कोतकर, सागर पाटील, उमेश वाणी, आबा बोबडे, उमेश वाघ, राजेंद्र चव्हाण, गडबड बोऱसे, आनंदा पाटील, किरण नाईक, सुनील बोबडे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.

वाळू डंपर अपघात तपास एलसीबी कडे वर्ग करावा तसेच गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी बंद करा अखिल भारतीय मराठा महासंघ

Image
  नवं दृष्टी न्यूज  संपादक -सचिन गुंजाळ  चाळीसगाव (वार्ताहर ) मेहुणबारा गुन्हा रजी नंबर77/2026 हा गुन्हा   एलसीबी कडे वर्ग करावा तसेच वाळू चोरी बंद करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांच्याकडे करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता चंचल नामदेव लांडगे राहणार रहीपुरी व वैष्णवी वैभव चौधरी राहणार चाळीसगाव या दोन्ही विद्यार्थिनी स्कुटीने राहिपुरी जात असताना दसेगाव  फाट्याजवळ  भरधाव वेगाने वाळूच्या डंपर ने स्कुटीला जोराने धडक दिली डंपरच्या दनक्याने दोन्ही विद्यार्थी जोराने रस्त्यावर फेकल्या गेल्या त्यात जबर मार लागल्याने चंचल नामदेव लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला वैष्णवी वैभव चौधरी  हिची  प्रकृती चिंताजनक आहे     संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते व महामार्ग ग्रामस्थांनी रोखून ठेवला होता संतप्त ग्रामस्थांचा ...

शिवसेनेत उमेश पाटील यांची दमदार एन्ट्री; धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड — शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवी ऊर्जा

Image
नवं दृष्टी न्यूज  संपादक -सचिन गुंजाळ शिवसेनेत उमेश पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी; धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केलेल्या श्री. उमेश पाटील यांच्यावर पक्षाने मोठा विश्वास दाखवत त्यांची धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नियुक्ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी कार्याची परंपरा पुढे नेणारी मानली जात आहे. शिवसेना प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उमेश पाटील यांनी आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात सक्रिय काम करत जनतेशी मजबूत नातं निर्माण केलं आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळे त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नियुक्तीनंतर पाटील यांनी पक्ष नेतृत्वाने ठेवलेला विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवणार असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकांसा...

गौताळा घाटात भीषण अपघात; आयशर वाहन १०० फूट दरीत कोसळले

Image
नवं दृष्टी न्यूज  संपादक -सचिन गुंजाळ  बारामतीहून दस्तापूरकडे परतणाऱ्या उसतोड मजुरांच्या आयशर वाहनाला गौताळा घाटात भीषण अपघात झाला. घाटातील धोकादायक वळणावर वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि आयशर सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत ७ जण गंभीर जखमी झाले असून ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. दस्तापूर (ता. सोयगाव) येथील मजूर बारामती येथे उसतोडीचे काम करून आपल्या गावी परतत होते. कन्नड-नगर मार्गावरील गौताळा अभयारण्य परिसरात अचानक ब्रेक फेल झाल्याने वाहन संरक्षण भिंतीवर आदळले आणि दोन पलट्या घेत दरीत कोसळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींची नावे : महेश अंडुरे (चालक, रा. खेड, पुणे), अशोक पवार (४५), कोमल हिरालाल पवार (८), प्रतीक प्रविण वाघ (४), प्रविण बापू वाघ (३०), सलीम जमाल तडवी (४५, रा. दस्तापूर, ता. सोयगाव) य...

सिलेंडर टंचाईचा प्रश्न गंभीर; काळाबाजाराचा संशय, कारवाईची मागणी रयत सेना

Image
  नवं दृष्टी न्यूज   चाळीसगाव (प्रतिनिधी): शहरात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर रोजच मोठ्या रांगा दिसत असल्या तरी अनेक ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही गॅस एजन्सीकडून जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याचबरोबर काही ठिकाणी गॅस सिलेंडर काळ्या बाजारात जादा दराने विक्री होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ग्राहकांना नियमानुसार मिळणाऱ्या दरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागत असून, बुकिंग करूनही वेळेत गॅस न मिळाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सींवर कठोर कारवाई करावी, तसेच पारदर्शक व नियमित गॅस वितरण व्यवस्था लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वडाळा-वडाळी येथे दिव्यांग मुलीवर ७२ वर्षीय व्यक्तीकडून अत्याचाराचा प्रयत्न

नवं दृष्टी न्यूज   चाळीसगाव : वडाळा-वडाळी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ७२ वर्षीय व्यक्तीकडून एका दिव्यांग मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी युवराज चव्हाण (वय ७२) यांनी २३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास गावातील एका १३ वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी घरी एकटीच होती. दरम्यान, अचानक मुलीचा भाऊ घरी आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि मोठा अनर्थ टळला. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हनुमानवाडी परिसरात गोळीबार; युवक जखमी

Image
नवं दृष्टी न्यूज  संपादक -सचिन गुंजाळ  चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी रात्री रेल्वे पुलाखाली गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत सिकंदर शेख या युवकाच्या खांद्याला गोळी लागून तो जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हनुमानवाडी परिसरातील रेल्वे पुलाखाली सिकंदर शेख याच्यावर गोळीबार केला. गोळी खांद्याला लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून झाला व आरोपी कोण आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे हनुमानवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.

अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक वनविभागाच्या कारवाईत जप्त

Image
नवं दृष्टी न्यूज  संपादक -सचिन दिलीप  (चाळीसगाव प्रतिनिधी) वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील मालेगाव रस्त्यावर अवैधरीत्या निम, लोखंडी व भोकर जातीचे जळाऊ लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक वनविभागाने जप्त केले. या कारवाईत MH19 G 0100 व MH20 DE 9252 क्रमांकाचे ट्रक ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांना 10 तारखेला रात्री गुप्त माहिती मिळाली की चाळीसगाव हद्दीतून अवैध लाकूड वाहतूक करणारे ट्रक मालेगावकडे जाणार आहेत. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा रचला. या कारवाईदरम्यान रात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास निम, भोकर व लोखंडी प्रजातींचे जळाऊ लाकूड भरलेला एक ट्रक पकडण्यात आला. ट्रक चालकाकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीपत्राची चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे हा ट्रक वनपरिक्षेत्र कार्यालय, चाळीसगाव येथे आणण्यात आला. त्यानंतर दुसरा ट्रक पहाटे सुमारे 4:30 वाजता पकडण्यात आला. या दोन्ही ट्रकविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल कर...

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने बक्षीस वितरण सोहळा संपन्न

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नवं दृष्टी न्यूज  चाळीसगाव (वार्ताहार) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 12 जानेवारी 2026 सकाळी 9 वाजता राष्ट्रीय कन्या शाळा येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने घेतलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजमाता जिजाऊ यांचे जीवनावर आधारित निबंध स्पर्धा 6 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय कन्या शाळा चाळीसगाव येथे घेण्यात आल्या होत्या .यावेळी या निबंध स्पर्धेत 480 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता .या निबंध स्पर्धेचा  बक्षीस वितरण सोहळा  राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय कन्या शाळा येथे आयोजित करण्यात आला होता . यावे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळीइयत्ता 8 प्रथम क्रमांक हर्षदा रविकिरण चव्हाण, द्वितीय क्रमांक पिंकी रामू कदरे, तृतीय क्रमांक श्रद्धा आशिष अहिरे, इयत्ता 9 वी प्रथम क्रमांक नेहा बापू चव्हाण, द्वितीय क्रमांक सेजल समीर धर्माधिकारी ,तृतीय क्रमांक यशश्री मनोज माळ...

आदिती जाधव हिस राजमाता जिजाऊ जयंती औचित्य साधून मराठा महासंघाच्या वतीने सन्मानित

Image
  संपादक -सचिन गुंजाळ नवं दृष्टी न्यूज  चाळीसगाव( वार्ताहार )आदिती जाधव हिला  अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सन्मानित करून  प्रमाणपत्र देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोल  येथील अदिती अंबादास जाधव हिने मध्यप्रदेशात आयोजित राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत  सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत देशातून आलेल्या नामांकित खेळाडूंना पराभूत करत अदितीने अंतिम फेरीत विजय मिळवून गोल्ड मेडल वर आपले नाव कोरले .या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .राजमाता जिजाऊ जयंती 12 जानेवारी 2026 रोजीचे अखिल भारतीय मराठा महासंघाने आदिती हिला सन्मानित करून प्रमाणपत्र दिले. व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे , जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले ,शहर उपाध्यक्ष कैलास पाटील ,शहर सचिव सचिन गुंजाळ ,युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील ,तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील तालुका संघटक शेखर पाटील उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठा महासंघाची ओढरे गावात फलक अनावरण

Image
  संपादक - सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज चाळीसगाव (वार्ताहर )अखिल भारतीय मराठा महासंघाची ओढरे गावात फलक अनावरण 14 डिसेंबर  रोजी सायंकाळी 6 ओढरे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या  हस्ते करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अखिल भारतीय मराठा महासंघाची 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता शाखेचे अनावरण चे नियोजन करण्यात आले होते . मा.राजेंद्र भाऊ राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांची आरती करण्यात आली. गावातील ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.ओढेरे गावातील या फलक अनावरण निमित्ताने  गावातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहकार्य केले . यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे यांनी आपल्या मनोगत सांगितले की , समाज एकजूट असावा, ग्रामीण भागात अनेक समस्या असल्यास त्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून निवेदन देऊन आंदोलन  करण्यात येईल . मराठा समाजबांधवर अन्याय अत्याचार झाला तर अखिल भारतीय मराठा महासंघ आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. तसेच इतर समाजातील कोणावरही अन्याय झाल्यास त्यास न्याय मिळवून देण्यासाठी आ...

विषारी कप सिरप मुळे 23 चिमुरड्यांचा मृत्यू कंपनीच्या संचालकाला अटक

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज   नवी दिल्ली: श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली. सिरपमध्ये शरीराला अपायकारक घटक मिसळण्यात आले. हे औषध ज्या चिमुरड्यांना देण्यात आले त्यांची तब्येत बिघडल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली. तब्येत खालावली आणि मध्य प्रदेशमधील २३ बालकांचा मृत्यू झाला, या प्रकरणाची सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. इथून पुढे कोणत्याही कफ सिरपची प्रत्येक बॅच तयार करण्याआधी त्याची चाचणी घेण्याचे बंधन सरकारने घातले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात कोल्ड्रिंक कफ सिरपची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच औषध विक्रेत्यांना कोल्ड्रिंकचा साठा असल्यास कंपनीकडे परत पाठवून द्या, असे आदेश दिले आहेत. विषारी कफ सिरप प्रकरणी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील घर आणि कांचीपुरम येथील कारखान्याला कुलुप लावून पत्नीसोबत फरार झाले होते. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने दोन दिवस तामिळनाडूतील चेन्नईत ठिकठिकाणी धाडी टाकल्या. पोलिसा...

चाळीसगाव नगरपालिकेचा प्रभाग रचनेचा तक्ता जाहीर

Image
संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी न्यूज  चाळीसगाव (वार्ताहार) नगरपालिका निवडणुकीसाठी चाळीसगाव शहरातील प्रभाग आरक्षणाचा तक्ता आज दिनांक 8ऑक्टोबर रोजी जाहीर केलेला आहे. एकूण 18 प्रभागासाठी अ आणि ब या गटानुसार पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.  तक्त्यानुसार  प्रभाग क्रमांक 1 ते 4 जनरल पुरुषांसाठी तर त्यांचे जोड प्रभाग अनुक्रमे जनरल महिला ,ओबीसी महिला आरक्षित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 7,8,10,11 ओबीसी पुरुषांसाठी तर त्यांच्या जोड प्रभागात जनरल व ओबीसी महिला यांना आरक्षण देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 9 एस सी पुरुष तर जोड प्रभाग  जनरल महिला यांच्यासाठी राखीव आहे.  प्रभाग क्रमांक 12 ते 18 या गटात बहुसंख्य प्रभाग जनरल पुरुषांसाठी असून जोड प्रभागात एसी महिला ओबीसी महिला आणि जनरल महिला आरक्षित करण्यात आले आहे.  या आरक्षणामुळे शहरातील विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत सोमवारी

संपादक -सचिन गुंजाळ नव दृष्टी   मुंबई -राज्याती २४७नगरपालिका आणि १४७नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या ६ ऑक्टोबरला सोमवारी सोडत काढली जाणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत काढली जाईल. या आरक्षण सोडतीच्या संदर्भात नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी शुक्रवारी राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. आरक्षण सोडतीसाठी पक्षाच्या दोन प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.